९३ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेल्या साहित्यिकांचा, साहित्यप्रेमींचा गुणगौरव मा.अस्मिता कांबळे,अध्यक्ष,जिल्हा परिषद उस्मानाबाद,मा.मंकरंद राजेनिंबाळकर,नगराध्यक्ष,नगर परिषद उस्मानाबाद,मा.मनोज सानप,जिल्हा माहिती अधिकारी,उस्मानाबाद,मा.नितीन तावडे,स्वागताध्यक्ष यांच्या हस्ते संपन्न झाला.
मराठवाडा साहित्य परिषदेच्या जिल्हा शाखेने या गुणगौरव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष,कोषाध्यक्ष,कार्यकारी समितीतील सदस्य व सर्व साहित्यिक,साहित्यरसिक उपस्थित होते.